पोस्ट्स

स्वप्न आणि आपण

              स्वप्न आणि आपण  असं म्हणतात , स्वप्न पूर्ण होतात म्हणून ती पहिली जातात..., पण पहिली जाणारी सगळीच स्वप्न कुठं पूर्ण होतात..?!.. काही पूर्ण होतात तर काही कल्पनेतच...... पण त्याच काही स्वप्नांना सत्यात उतरवताना नाकीनऊ येतं ...  खरं तर , एक वेळ अशी येते की आपली स्वप्ने ही केवळ आपली न राहता नाहीत ती आपल्या  कुटुंबाची आणि जवळच्यांची होऊन जातात...... तिथवर सारं काही ठीक .., पण ध्येयाच्या जवळपास पोहचायला अवधी बाकी असतानाच परत सारं काही पूर्ववत झालं तर??  जैसे थे! परत शुण्यापासून सुरूवात..... अशावेळी भीती वाटायला सुरुवात होते...., दडपण येऊ लागतं...  वेळ रेतीसारखा हातातून निसटून जातोय आणि आपण आहे तिथेच... आयुष्य थांबलंय की काय असं वाटतं... स्वतःवर ठेवलेला विश्वास जणू डळमळीत होऊ लागतो... ते म्हणतात ना self daubt तसं काहीसं...... आजवरचा सारा प्रवास डोळ्यासमोर तरळू लागतो....  यश अपयशाची गोळाबेरीज होऊ लागते.... आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही आपले त्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत की नाही हे पाहणं जरुरीचं असतं तेही वेळोवेळ...

आयुष्य आणि बरंच काही...

"आकाशात आणि आयुष्यात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्याने कोणत्याच पाशात अडकायच नसतं" ..... असं व पुं च्या लिखाणातून वाचनात आलेलं..... खरंच गुंतणं किती अवघड आहे अन् बाहेर पडणं मुश्किल  मग ते स्वप्न असोत किंवा व्यक्ती....प्रेम असो वा मनासारखं करिअर... स्पर्धा परीक्षा असो वा स्वतः चा स्टार्टअप... त्यात आपलंच आपल्या पासून दुरावणं....,किती भयानक असतं......आपल्या गोष्टी सोडून दुसऱ्यात हरवून जाणं सोपं वाटतं पण परत येणं खूप मुश्किलीेचं...... आयुष्य मस्त जगायचं serious व्हायला तरी कुठं असतं तेवढं आयुष्य?स्वतःहून योग्य त्या वेळी नाही serious झालो तर आयुष्य आपल्याकडनं ते करवून घेतच म्हणा.... कशाला मग तो विचारांचा अती ताण,? सारी कसरत आयुष्य नीट करायला...ते नीट होऊ बघत तोवर नवीन कायतरी.......पण हेच तर आयुष्य आहे.... It's a journey with lots of miracles .....it's a bunch of happiness, sorrows ,struggles, hurdles, smiles, pain and so on..... live it without overthinking and without being damn serious..till u r breathing....u have nt control on this.... हे समजलं की आपण अजून जगायला लागतो.... वा...

तेच ते

                                तेच ते  उद्या कॅलेंडर बदलेल.... पण सामान्यांच्या आयुष्याचं काय? रोजचं जगणं तेच भाकरीसाठीची वणवण करणं तेच ते... तिच लोकल तोच प्रवास तेच रातच्याला उशाशी टेकणं तेच ते... एका दिवसाचा खटाटोप हा.., सरत्याला घालवायला श्रीमंतांचा पार्टीचा अट्टाहास हा आम्हाला मात्र उद्याची चिंता., सामान्य माणसाची जणू हीच व्यथा... तेच ते...... नवीन संकल्प रचती सारे नऊ दिवस वाही वारे तेच ते... रोजची उठाठेव तीच प्रेयसी प्रियकराच्या मिलनाची वेळ हीच तेच ते... संसाराचा रहाटगाडा ओढणारा तो त्याच्या सोबतीने चालणारी ती...., संसारात अडकलेले सारे मग मनी वाटे बॅचलरच बरे तेच ते..... दिवसाचा व्यवहार रात्रीचा अंधार ., यश अपयशाची चढाओढ जिंकेल त्याचा गवगवा हरेल त्याचा परत डाव नवा..., तेच ते..... दिवसामागून दिवस जाती., वय रेतीसारख सुटू पाही कवळ्या दातांपासुन ते कवळी पर्यंतचा हा प्रवास तेच ते..... तरी वाटे आशा देऊ जगण्याला नवी दिशा., आयुष्य ते कितीसं जगून घेऊया आजच्या क्षणात जरासं., नाहीतर आहे तेच ते...... धन...

जगणं आणि बरंच काही....

जगणं आणि बरंच काही...... काही गोष्टी अन् व्यक्ती आणि आलेली परिस्थिती ही आपण किती granted घेतो ना... वाटतं आता सारं काही आलबेल.... तुमच्या व्यक्तिगत पातळीवर चाललेला तुमचा यशाचा संघर्ष, त्याला साक्षीदार असलेल्या काही व्यक्ती आणि जोडलं गेलेलं नातं ही ..हे सारेच आले त्यात..... वाटतं आता तरी गोष्टी आणि यशाचा मार्ग ही सुकर....कष्ट तेवढंच करायचेत पण मायेचं बोलणंआणि तितक्याच आत्मीयतेने विचारपूस गरजेची..... रखरखत उन पडल्यावर कुठेतरी सावली साठीच झाड दिसावं असच काहीसं. ...... स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात अशी लोक भेटणं म्हणजे अहोभाग्य म्हणायचं आपलं..... आपल्या सुखात आणि कधी demotivated वाटलंच तर हक्काने बोलणारे अजूनच जवळचे वाटतात.... त्यांचं ते बोलणं आणि असणं मग हवंहवंसं,आधार देणारं वाटतं.......हळूच वाऱ्याची झुळूक यावी अन् मन आनंदून जावं इतकं ते मनाला भावणारं ..... पण कधी कधी नियती तेवढ्यात जोराचा झटका देते आणि भान हरपून चालणाऱ्या तुमच्या मनाला वास्तवात येऊन उतरवते....ढीगभर नसले तरी मोजकेच बरे .., तुम्हाला आणि नात्याला जपणारे ..,असं जणू सांगत असते....मग काय सारं काही पूर्ववत अगदी.... करणं तर तु...

सोडून द्यायचं असतं

  सोडून द्यायचं असतं ....   सारं काही आलबेल सुरू असताना अचानक अनपेक्षित घडावं आणि आपण एकटे सामोरे जावं असंच काहीस आयुष्यात घडतं.....कधी ही कल्पना केली नाही असे अनुभव येतात.... दुःखाचा डोंगर जणू आपल्यावरच कोसळलाय का असा प्रश्न पडतो मग...... थोडक्यात काही marks नी result जाणं असो किंवा कुशलता असून हवी ती नोकरी न मिळणं असो मग....   आयुष्यात कधी मनासारखं घडतं तर कधी मनाविरुद्ध ... सारं काही अनिश्चित..... कधी वेळ तर कधी लोक....भेटलेली माणसं.... कधी कधी आपला भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी देव असे प्रसंग अन् अनुभव देतो तर कधी आपल्याला वेळोवेळी मार्गावर आणण्यासाठी. .... एखद्या गोष्टी बद्दल किंवा व्यक्ती बद्दल किती गृहीत धरून चालतो आपण..... मी असा अभ्यास केला तर यावेळी हवा तो result निश्चितच .. पण नंतर तोच काही मार्क्सनी गेला तर..??.. सारं काही पहिल्या पासून सुरुवात....फक्त फरक काय तो चुकांचा शोध अन् अनुभव गाठीशी...ही एक जमेची बाजू.... यश त्यानंतरचा आनंद आवडतोच प्रत्येकालाच.....पण मार्ग मात्र अपयश निराशा अन् परत नव्याने उभारी घेणं यातून जातो हे मात्र आपण विसरतो.....पाठीशी खंबीर अस...

सीमोल्लंघन

    सीमोल्लंघन जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी एक तुतारी द्या मज आणुनी...  केशवसुतांची ही कविता आज पुन्हा आठवणीत आली.... किती मार्मिक भाष्य......वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे..... एरवी आनंदाच्या गप्पा मारणारे आपण मात्र एकटं असताना आयुष्यात आजवर घडलेल्या घटना, झालेल्या चुका, आलेले कठीण बरे- वाईट प्रसंग , नकारात्मक विचार अन् तश्या व्यक्ती कैक गोष्टींचे ओझं डोक्यावर अन् मनावर घेऊन फिरत असतो .. अन् त्यातून मिळत काय तर काहीच नाही......उलट होतो तो मनस्ताप..,चिंता, स्वतःवर येणारा राग , वाया घालवलेला/गेलेला वेळ....हे बघून जास्तच वाईट वाटत ...पण हे वाटणं स्वाभाविक साहजिक आहे... पण नुसत वाटून घेऊन परत तेच करायचं का?? तर नाही......जर झालेल्या चुका तुम्हाला समजल्या असतील तर त्यावर विचार केला वाईट वाटलं इथवरच न थांबता त्यावर काम करायला हवं..... म्हणजे परत त्या होऊ नये यासाठी..... नाहीतर होतं ते repeatation   of Cycles .... त्याचं गर्तेत अजून अडकत जातो आपण आणि साध्य काहीच नाही ...... म्ह...

आयुष्य जगताना....

  आयुष्य जगताना .......  " खूप काही करायचं होत कल्पनेतच राहून गेलं... वाटलं करावसं तर वयचं निघून गेलं...... आहे तस जगण्यावाचून काय आहे आता हाती पश्चात्ताप होतोय आता जबाबदाऱ्या बघू की स्वप्न साकारू.... स्वप्न हे स्वप्नच राहील आता".....,  अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर आता जे करायचं आहे ते आताच करा.....तुम्ही उमेदीच्या कोणत्याही वयात असा त्यातसुरुवात  करा......एका दिवसात यश मिळत नाही ...वर्षे  लागतात हवं ते मिळवायला....पण सुरुवात करून हळूहळू स्वतः मध्ये आणि आहे त्या कामात study मध्ये improvement हवी तर स्वप्न पूर्ण करता येईल... नाहीतर उतार वयात पश्चातपा शिवाय हाती काही नाही .... आता वय आहे संधी आहे आणि सोबती असणाऱ्यांचा support ही.....मग विचार कसला..... जे करायचं ते आजच.... कारण उद्या कधीच नसतो....तो फक्त 'आज'च असतो... भूतकाळात गेला की 'काल'... काही ही करताना Result काय असेल माहिती नसतं पण स्वतःवर विश्वास ठेवून आपण करत असतो की नाही ...यशस्वी होणारे हेच करतात... ' कर्म करत चल ',फळाची अपेक्षा नको'....आपली 'भगवद्गीता'  हेच सांगते ना..... पण ठाम अस...

पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य

  पळवाटा अनिश्चितता आणि आयुष्य ठरवेल तसंच होईल असं  आयुष्य म्हणजे परिपूर्णच म्हणावं लागेल...... आयुष्यात कित्येकदा ठरवलेल्या गोष्टी, काम सोडून.., न ठरवलेल्याच गोष्टी घडताना दिसतात..... याच  एक कारण की सगळंच आपल्या हातात नसतं...नियतीला काही वेगळचं मान्य असतं.... तुमच्याकडून ते व्हावं ही अपेक्षा..... अन् दुसरं म्हणजे जे करायचंय त्याला दिशा नसणं ,त्याबद्दलची स्पष्टता नसणं....,धाडसाने सामोरे जाण्याची तयारी नसणं आणि अपयश पचविण्याची ताकद कमी पडणं...... यामुळेच माणूस पळवाटा शोधतो.... पण याने  योग्य तो मार्ग भेटत नाही तर माणूस पर्याय शोधतो.... अंतिम ध्येयापर्यंत पोहोचणं दूर... नुसतं भटकत राहतो....,  कौशल्य असून ही जीर्ण झालेल्या अडगळीत पडलेल्या पुस्तकासारखं वाटतो मग....., अस्तित्व टिकविण्याची धडपड सुरू असते...., स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज वाटू लागते.., आपल्यावर विश्वास ठेवणारे , पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची प्रतिमा उजळ कशी होईल याचा प्रयत्न केला जातो........, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात अन् पुढचं सारं काही धूसर होतं......, जगावं तर कसं जगावं हा प्रश्न प...

किंमत

                    किंमत काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते....  असं म्हणतात देव आपली परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आपली मनस्थिती बदलायची असते... पण मनःस्थितीच नाही बदलली तर?  त्याच सवयी असतील तर? माहिती असून ही त्याच त्याच चुका करत असू तर??  तर मग repitation of cycles ....   म्हणूनच कधी कधी देव मनःस्थिती बदलायला परिस्थिती बदलव तो .....जेणेकरून तुम्ही स्वतः ला आतून change करायला हवं....बाहेरचा दिखावा काय कामाचा?....तुम्ही लोकांना फसवू शकता पण स्वतः च काय? स्वतःशी प्रामाणिक असावं माणसानं मग दुसऱ्यांशी ....  आयुष्यात काय करावं कसं करावं कधी करावं..हे सगळं आपल्यालाच बघायचं असतं ..... नाही तर आयुष्य संपत नाही म्हणून जगणारे ही आहेत.....मरण येत नाही म्हणून आणि आलोय जन्माला म्हणून दिवस काढणाऱ्यांची कमी नाही...आणि success भेटत नाही म्हणून हार मानणाऱ्यांचीही कमी नाही...आपण त्यातले कोण हे बघणं जरुरी.....   प्रेमात risk घेणाऱ्याला आपल्याकडे मोठं समजतात त्यात arrange marriage करणाऱ्यांच ही...

जगणं आणि बरंच काही.....

  जगणं आणि बरंच काही..... आयुष्यात सारं काही मनासारखं घडेलंच असं नाही... काही अचानक आलेल्या बदलांना ही  सामोरं जावं लागतं...,  तसचं अचानक आलेल्या माणसांना ही ओळखून घ्यावं लागतं..... आयुष्यात येणारी माणसं आणि  परिस्थिती काही सांगून येत नाही.....आणि ती कशी हे वेळ आल्यावरच समजत ....   आजच्या काळात खरंच आपलं कोण आणि आपलं आहे असं दाखवणार कोण हे वेळेवर समजणं गरजेचं.....वयानुसार हे  समजेलच असं नाही पण सदविवेकबुद्धी जागृत असेल तर लवकर ज्ञात होत असावं..... आयुष्यात मार्ग काढत निघालेल्या व्यक्तीला परिस्थितीच ओझ काय कमी असतं म्हणून हे माणसांचं ही.....पण चांगली लोक आहेत म्हणून जगण्याला अर्थ ही आहे अन् आपल्या गुणांना ही....आणि संतांनी म्हंटलच आहे,"निंदकाचे घर असावे शेजारी".... असो, जीवनात अनेकवेळा मनाविरुद्ध घडतं....हवं तेव्हा हवी ती परिस्थिती आणि माणसं सोबत असतीलच असं नाही अश्यावेळी अनपेक्षित बदलांशी जुळवून घेणे तेवढंच महत्त्वाचं..... त्यात जर असे बदल ध्येयाच्या मार्गात येणारे असेल तर  accept it & live it ....Or leave it .... I mean to say,  Either change...

वेळेवर "नाही" म्हणायला शिकायला हवं

इमेज
वेळेवर "नाही" म्हणायला शिकायला हवं..... आयुष्यात वेळेवर " नाही " म्हणायला शिकायला हवं.... कधी कधी हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणायचं खूपच अवघड होऊन जातं...... नाही म्हणायची वेळ आली की आपलं मन आपण विचार करायला लागतो तो म्हणजे समोरच्याला काय वाटेल.?.. तेच जवळचे असतील तर ते काय म्हणतील?  वाईट वाटेल काय त्यांना..?असे प्रश्न मनात घर करतात....  आपलं time जातंय ,किंवा आपल्याला ते करायचं नाही तरी आपण ते करतो...मनाविरुद्ध.....मग ते non productive गप्पा गोष्टींमध्ये मित्रांमध्ये,नातेवाईकांमध्ये किंवा आजूबाजूला जाणारा time असो किंवा carrier असो वा आयुष्यभरासाठीचा जोडीदार निवडताना.... मग नंतर नशिबाला बोल देतो आपण.... हे समजून ही वेळेवर नाही म्हणता येत नाही नसेल तर मग अवघड आहे....कधी हिंमतच नाही होत तर कधी स्वतःलाच जाणीव नसते वेळेची.... आपणच आपल्या वेळेची कदर नाही करत नाही तर लोक का करतील?  ज्या गोष्टी खरंच नको वाटतात आपल्या वेळ खर्चिक किंवा मनाविरुद्ध वाटतात त्यांना वेळीच "नाही" म्हणता यायला हवं.... हेचं आहे आपल्या हाती ... बाकी आयुष्यात कधी काय घडेल कशी परिस्थिती निर्मा...

मुखवट्यांच आयुष्य

  मुखवट्यांच आयुष्य मुखवट्यांच आयुष्य ते कितीसं?... कित्येक प्रकारचे मुखवटे घालून आपण रोज मिरवत असतो कधी मजबुरी म्हणून तर कधी दुःख आपल्याजवळ राहावं अन् सुख वाटावं म्हणून तर कधी एकद्याची नियतच तशी असते म्हणून..... पण मुखवटे खरंच गरजेचं ?...हो पण अन् नाही पण...., पण आपण तसचं वावरतो..., ते धारण करूनच......अगदी कंटाळवाण वाटलं तरी,....कधी स्वतः साठी तर कधी दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना... फक्त माणसाची नियत साफ असावी.... पण आजकाल मुखवटे खोटे आणि दुसऱ्याला फसावण्यासाठीच जास्त वापरतात लोक....  social media वरती ही सर्रास बघतो....इतरांचे चांगले चुंगले photos आणि updates बघून आपलंच आयुष्य असं गंडलयं का?😀 असं कित्येकांच्या मनात येणं साहजिकच आहे... पण खरचं एखाद्या post/photo/video किंवा story वरून आपण एखाद्याचं सगळंच चांगलं आणि आपलं वाईट असं तर्क काढणं मुळात चुकीचं आहे.....  प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात काही ना काही problems असतात...पण प्रत्येकजण जे काही चांगलं आहे तेच टाकत असतो ,हेच दाखवत असतो social media वरती....आणि  खऱ्या आयुष्यात आणि मनात काही वेगळंच..... सगळ्यांना संघर्ष ,...

Priorities

        Priorities मला आयुष्यात हे हवय पण मला करायचा कंटाळा आहे..आणि या उलट माझं ध्येय हे आहे अन् मी ते पूर्णत्वास नेण्यासाठी माझे १००% प्रयत्न देणार... असं दोन्ही गोष्टी बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत.... आपण त्यातले कशात? हे ओळखणं महत्वाचं... स्वप्न पूर्ण करायची असतील तर प्रयत्न ही तसेच लागतात.... फक्त कल्पना करून काय होणारेय?..... कृती ही तशीच हवी...इच्छाशक्तीची जोड कृतीला असेल तर सारं काही शक्य आहे... कृतिविना विचार म्हणजे  मनात निव्वळ कल्पनांचे  मांडे रचल्या सारखंच आहे... आयुष्यात स्पष्टता हवी..., कुठं थांबायचं ,कुठवर चालायचं अन् कुठं पोहचायचं याची... आपल्या ध्येयपूर्ती च्या प्रवासात आपण सर्वात जास्त महत्त्व कशाला देतो यावर आपलं यश अपयश अवलंबून असतं.... येणाऱ्या प्रलोंभाना की मिळालेल्या वेळेला? अडथळे बनू पाहणाऱ्या लोकांना की  त्या परिस्थितीत साथ देणाऱ्यांना ? अतिविचाराने वाहवत जाण्याला की ठरवलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याला? हे आपलं आपल्याला ठरवावं लागतंच ....जितक्या लवकर ठरवता येईल तेवढ्या लवकर ध्येयाने जवळ पोहचू..... त्यासाठी आपल्या prioritie...

महापुरुषांचा वारसा आणि जातीपाती

  महापुरुषांचा वारसा आणि जातीपाती जेंव्हा मी छत्रपती शिवरायांवरती कविता लिहली राजर्षी शाहू बद्दल स्तुतीसुमने गायली तर तेव्हा त्यांनी मला विचारलं तू मराठ्याची का?., ज्यावेळी मी महात्मा फुलेंवरती लिहलं त्यांनी विचारलं तू माळी जातीची का?., आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके आणि उमाजी नाईकांचे गुण गायले तर विचारले ब्राह्मण की नायकाचे ओ तुम्ही?., डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ काही लिहले तर  मागून आवाज आला... दलित समजातून वाटतं..., अशी कैक गोष्टी ,उदाहरणे आहेत.. .. संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर एकनाथ महाराज चोखामेळा संत गाडगे महाराज तुकडोजी महाराज.... कित्येक वर्षांपासून यांनी एकतेसाठी कामे केली ....आणि आपण आज... आधीपेक्षा ही जास्त बुरसटलेले आहोत.....लाज वाटायला हवी आपल्याला.....आपल्या लोकांनी आपली त्या वेळची परिस्थिती सुधारण्यासाठी काय काय केलं ....हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथा रुढी नष्ट व्हाव्यात अन्  धर्मातल्या चांगल्या गोष्टींचा प्रसार व्हावा यासाठी नाना प्रयत्न केले....एकीने जगू आपण म्हणून प्राणार्पण केले त्यांनी अन् आज?आज काय परिस्थिती आहे? ज्या समाज सुधारकांनी क्रांति...

स्पष्टता

इमेज
          स्पष्टता   आयुष्यातली आणि विचारांतली स्पष्टता माणसाला एक दिशा देते ....जगण्याला आणि आयुष्यात हवं ते साध्य करायला.....अन् नेमकं तेच नाही जमलं तर ? तर फरफट होते आयुष्याची आणि स्वतः ची ही.... दिशाहीन होत सारं काही मग.....अस्ताला जाणारा सुर्य ही आपल्याकडे पाठ फिरवून जातो असंच वाटतं.., हेलकावे खात आपली नाव असच भरकटते मग दिशाहीन होऊन..., पापण्या पाणावून डोळ्यांसमोर जणू सारं काही धूसर व्हायला लागतं.... आयुष्यात अशी परिस्थिती आली की घरच्यांशी आपल्या जवळच्या मित्र परिवार किंवा आपल्याला योग्य मार्ग दाखवेल अश्या व्यक्ती सोबत बोलावं.... आणि कुणी मार्गदर्शन करावयास नसेल तर स्वतःच स्वतःच मित्र तत्वज्ञ वाटाड्या व्हावं.. ... शांत राहुन आपल्यातच डोकवावं काय चुकले , का चुकले आणि आता काय करायला हवं....काय करायला नको होत आणि इथून पुढे काय टाळायला हवं ते आपसुकच समजतं मग... आयुष्यात सगळ्यांनाच सगळं काही मिळालं असतं तर? संघर्ष तो कसला ना... आव्हानं आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे आणि केलेले कष्टांना ही...मग ते आपल्या घरचे असो वा तुम्ही स्वतः.... योग्य मार्गावर असलो तर उत्...

बदलांच्या वळणावर.....

  बदलांच्या वळणावर ...... आयुष्य बदललेल आपल्याला बघायचं असतं , अनुभवायचं असतं ,आपल्याला बदलायच मात्र नसतं....  असं म्हणतात  बदल अशी गोष्ट आहे की आयुष्यात कायम स्थिर आहे.., आपण बदलेना की निसर्ग किंवा नियती ते बरोबर घडवून आणते आपल्यात आणि परिस्थितीत ही.... मनाला आणि माणसाला एकांतात बसलं की काय चुकत कुठं चुकत हे बघायला चांगलं जमतं....,नाहीतर एरवी माणूस स्वतचं कमी अन् दुसऱ्याच्या चुका आणि गोष्टी यातच जास्त लक्ष देत असतो... आयुष्य थांबल्या सारखं वाटतं असलं तरी बदल हे सुरूच असतात आपल्याला त्या वेळेप्रमाणे बदलायच आहे हेच जणू ते सांगत असतात... काळाच्या ओघात हे खूप काही शिकवून मात्र जातात., आपल्याला घडवून जातात... मनाला आणि माणसाला ते accepted नसतं कारण  काही बदल मनासारखे असतात तर काही मनाविरुद्ध .... जे चाललय तेच चालत राहावं असं वाटतं  आणि असं असतानाच बदल स्वीकारायलाही तयार व्हावं लागतं.., पण हे खरचं आहे  नाहीतर मग आहे त्याच गोष्टी repeated घडतात आणि मग तेच चक्र.... So.., If  You Want to Change in Your life then You have to change yourself  first ..,Chang...

जगणं आणि बरंच काही...

    जगणं आणि बरंच काही .... आठवणीं आणि भावना यांचा खेळ काय तो निराळाच ... आठवणींचा डोंब मनात उसळला की विचार आणि भावनांची गुंफण होवू लागते....आठवणी नेहमीच चांगल्या किंवा हव्या हव्याशा असतीलच असं नाही....कधी कधी त्या संमिश्र ही असतात...कधी चेहऱ्यावर स्मित हास्य आणतात तर कधी पापण्या पाणवतात...... कधी स्वतःच  स्वतःच कौतक करायला भाग पाडतात तर कधी आपण अस का केलं म्हणून स्वतःवर राग आणायचं काम करतात......काही ही असली तरी आठवणी या आपल्या सावलीसारख्या आपल्या सोबत असतात.....आयुष्याच्या flash back मध्ये तर त्याच घेऊन जातात....पण त्यांना कसं घ्यायचं..,म्हणजे positive way ने घेऊन आनंदी राहायचं, झालेल्या गोष्टींपासून काय सुधार करता येईल हे बघायचं की त्यातच अडकून रहायचं हे सगळं आपल्यावरच..... चुकांचा, विचारांचा आणि आपल्याकडे आता काय नाही त्याचा अतिरेक न करता सद्य परिस्थितीत काय करता येईल  हे बघणं खूपच गरजेचं ....नाहीतर मग मानसिक त्रास आणि निराशेची गर्ता यायला ही वेळ नाही लागत...आपल्या अवतीभोवती हेच बघतो आपण.., अगदी आपल्या आयुष्यात ही...... कारण कधी कधी मन हे चांगल्या गोष्टीं पेक्षा ...

वाचन लेखन आणि बरंच काही.....

  वाचन , लेखन आणि बरंच काही....  #spirituality #life#reading #writing #जगणं वाचणाऱ्याला (अर्थात वाचकाला) एखादं पात्र आपल्याशी मिळतं जुळत वाटावं.., त्याला जे सांगायचंय तेच  आपल्या प्रश्नाचं उत्तर असावं का..? इतकं साम्य आणि तारतम्य कसं काय? मनात प्रश्नांनी कल्लोळ माजवावा आणि उत्तर मिळावं..., इतकं सोप्पं?... मनात शंका यावी अन् त्याचं निरसन व्हावं, कधी कधी हे आपल्याशीच घडतं याचच अचरज.., काही सांकेतिक भाषेतून आपल्याशी संवाद व्हावा ,एक अशी शक्ती जी तुम्हाला ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करते... खरंच असं असावं? ....किती उशीर हे सगळं समजायला?....पण सगळ्यांच्या येत का हे ध्यानी?.....असावं बहुदा किंवा नसेल ही... प्रत्येकामध्ये काही अंतरिक शक्ती असते...,स्वतच्या intution ने स्वतः सोबत इतरांना ही guidence मिळायलाच हवा हाच हेतू असावा नियतीचा त्यामागे.... आयुष्याच्या या प्रवासात किती गोष्टी सोडाव्या लागतात किंबहुना लोक ही...काही आपण cut off करतो काही नियती...तर कधी भरभरून देते ही...गोष्टी आणि आपलं हित जपणारी लोक ही... अजुन किती तरी मैल जायचंय..,काही गोष्टी अदृश्य असून कसं काय संवा...

अलिप्तता आणि मी.....

  अलिप्तता आणि मी.... आजकाल मी न बोलताच सगळं काही बोलून जाते...माहिती का पण न बोलताच सारी नाती जपावीशी वाटतात आजकाल.., आजूबाजूच्या गोष्टी आणि लोकं कळली की मग आपला सहवास आणि स्वतचं time ही खूप precious आणि हवं हवसं वाटतं...
  जातीयवाद आणि आपण....पुरोगामी?आपण? Castism and our society सुशिक्षित असून ही अडणीपणाने वागणारे आपण..... आपलं कुटूंब अन् आपला समाज....जाती आपल्यासाठी की आपण जातीसाठी?..हाच मुळी मोठा प्रश्न मनाला भेडसावतोआहे आता...एकजुटीने राहण्यासाठी आपल्यातल्या जातीयवादाच्या दऱ्या मिटण्या साठी महापुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावली.....अन् आपण आज काय करत आहोत?