पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोडून द्यायचं असतं

  सोडून द्यायचं असतं ....   सारं काही आलबेल सुरू असताना अचानक अनपेक्षित घडावं आणि आपण एकटे सामोरे जावं असंच काहीस आयुष्यात घडतं.....कधी ही कल्पना केली नाही असे अनुभव येतात.... दुःखाचा डोंगर जणू आपल्यावरच कोसळलाय का असा प्रश्न पडतो मग...... थोडक्यात काही marks नी result जाणं असो किंवा कुशलता असून हवी ती नोकरी न मिळणं असो मग....   आयुष्यात कधी मनासारखं घडतं तर कधी मनाविरुद्ध ... सारं काही अनिश्चित..... कधी वेळ तर कधी लोक....भेटलेली माणसं.... कधी कधी आपला भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी देव असे प्रसंग अन् अनुभव देतो तर कधी आपल्याला वेळोवेळी मार्गावर आणण्यासाठी. .... एखद्या गोष्टी बद्दल किंवा व्यक्ती बद्दल किती गृहीत धरून चालतो आपण..... मी असा अभ्यास केला तर यावेळी हवा तो result निश्चितच .. पण नंतर तोच काही मार्क्सनी गेला तर..??.. सारं काही पहिल्या पासून सुरुवात....फक्त फरक काय तो चुकांचा शोध अन् अनुभव गाठीशी...ही एक जमेची बाजू.... यश त्यानंतरचा आनंद आवडतोच प्रत्येकालाच.....पण मार्ग मात्र अपयश निराशा अन् परत नव्याने उभारी घेणं यातून जातो हे मात्र आपण विसरतो.....पाठीशी खंबीर अस...

सीमोल्लंघन

    सीमोल्लंघन जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी एक तुतारी द्या मज आणुनी...  केशवसुतांची ही कविता आज पुन्हा आठवणीत आली.... किती मार्मिक भाष्य......वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे..... एरवी आनंदाच्या गप्पा मारणारे आपण मात्र एकटं असताना आयुष्यात आजवर घडलेल्या घटना, झालेल्या चुका, आलेले कठीण बरे- वाईट प्रसंग , नकारात्मक विचार अन् तश्या व्यक्ती कैक गोष्टींचे ओझं डोक्यावर अन् मनावर घेऊन फिरत असतो .. अन् त्यातून मिळत काय तर काहीच नाही......उलट होतो तो मनस्ताप..,चिंता, स्वतःवर येणारा राग , वाया घालवलेला/गेलेला वेळ....हे बघून जास्तच वाईट वाटत ...पण हे वाटणं स्वाभाविक साहजिक आहे... पण नुसत वाटून घेऊन परत तेच करायचं का?? तर नाही......जर झालेल्या चुका तुम्हाला समजल्या असतील तर त्यावर विचार केला वाईट वाटलं इथवरच न थांबता त्यावर काम करायला हवं..... म्हणजे परत त्या होऊ नये यासाठी..... नाहीतर होतं ते repeatation   of Cycles .... त्याचं गर्तेत अजून अडकत जातो आपण आणि साध्य काहीच नाही ...... म्ह...

आयुष्य जगताना....

  आयुष्य जगताना .......  " खूप काही करायचं होत कल्पनेतच राहून गेलं... वाटलं करावसं तर वयचं निघून गेलं...... आहे तस जगण्यावाचून काय आहे आता हाती पश्चात्ताप होतोय आता जबाबदाऱ्या बघू की स्वप्न साकारू.... स्वप्न हे स्वप्नच राहील आता".....,  अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर आता जे करायचं आहे ते आताच करा.....तुम्ही उमेदीच्या कोणत्याही वयात असा त्यातसुरुवात  करा......एका दिवसात यश मिळत नाही ...वर्षे  लागतात हवं ते मिळवायला....पण सुरुवात करून हळूहळू स्वतः मध्ये आणि आहे त्या कामात study मध्ये improvement हवी तर स्वप्न पूर्ण करता येईल... नाहीतर उतार वयात पश्चातपा शिवाय हाती काही नाही .... आता वय आहे संधी आहे आणि सोबती असणाऱ्यांचा support ही.....मग विचार कसला..... जे करायचं ते आजच.... कारण उद्या कधीच नसतो....तो फक्त 'आज'च असतो... भूतकाळात गेला की 'काल'... काही ही करताना Result काय असेल माहिती नसतं पण स्वतःवर विश्वास ठेवून आपण करत असतो की नाही ...यशस्वी होणारे हेच करतात... ' कर्म करत चल ',फळाची अपेक्षा नको'....आपली 'भगवद्गीता'  हेच सांगते ना..... पण ठाम अस...