पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किंमत

                    किंमत काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते....  असं म्हणतात देव आपली परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आपली मनस्थिती बदलायची असते... पण मनःस्थितीच नाही बदलली तर?  त्याच सवयी असतील तर? माहिती असून ही त्याच त्याच चुका करत असू तर??  तर मग repitation of cycles ....   म्हणूनच कधी कधी देव मनःस्थिती बदलायला परिस्थिती बदलव तो .....जेणेकरून तुम्ही स्वतः ला आतून change करायला हवं....बाहेरचा दिखावा काय कामाचा?....तुम्ही लोकांना फसवू शकता पण स्वतः च काय? स्वतःशी प्रामाणिक असावं माणसानं मग दुसऱ्यांशी ....  आयुष्यात काय करावं कसं करावं कधी करावं..हे सगळं आपल्यालाच बघायचं असतं ..... नाही तर आयुष्य संपत नाही म्हणून जगणारे ही आहेत.....मरण येत नाही म्हणून आणि आलोय जन्माला म्हणून दिवस काढणाऱ्यांची कमी नाही...आणि success भेटत नाही म्हणून हार मानणाऱ्यांचीही कमी नाही...आपण त्यातले कोण हे बघणं जरुरी.....   प्रेमात risk घेणाऱ्याला आपल्याकडे मोठं समजतात त्यात arrange marriage करणाऱ्यांच ही...

जगणं आणि बरंच काही.....

  जगणं आणि बरंच काही..... आयुष्यात सारं काही मनासारखं घडेलंच असं नाही... काही अचानक आलेल्या बदलांना ही  सामोरं जावं लागतं...,  तसचं अचानक आलेल्या माणसांना ही ओळखून घ्यावं लागतं..... आयुष्यात येणारी माणसं आणि  परिस्थिती काही सांगून येत नाही.....आणि ती कशी हे वेळ आल्यावरच समजत ....   आजच्या काळात खरंच आपलं कोण आणि आपलं आहे असं दाखवणार कोण हे वेळेवर समजणं गरजेचं.....वयानुसार हे  समजेलच असं नाही पण सदविवेकबुद्धी जागृत असेल तर लवकर ज्ञात होत असावं..... आयुष्यात मार्ग काढत निघालेल्या व्यक्तीला परिस्थितीच ओझ काय कमी असतं म्हणून हे माणसांचं ही.....पण चांगली लोक आहेत म्हणून जगण्याला अर्थ ही आहे अन् आपल्या गुणांना ही....आणि संतांनी म्हंटलच आहे,"निंदकाचे घर असावे शेजारी".... असो, जीवनात अनेकवेळा मनाविरुद्ध घडतं....हवं तेव्हा हवी ती परिस्थिती आणि माणसं सोबत असतीलच असं नाही अश्यावेळी अनपेक्षित बदलांशी जुळवून घेणे तेवढंच महत्त्वाचं..... त्यात जर असे बदल ध्येयाच्या मार्गात येणारे असेल तर  accept it & live it ....Or leave it .... I mean to say,  Either change...